गृहिणींचा प्रजासत्ताक
वाचक मंडळी १ फेब्रुवारी पासून रहस्यकथा आणत आहोत.
वाचकांपैकी कुणाला लिहायच्या असल्यास कृपयाआमच्या इमेलवर पाठवा.
gajbhiye.preeti1972@gmail.com )
गृहिणींचा प्रजासत्ताक
मोबाईलवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा एक दिवस आधीच झळकू लागल्या . आणि माझी म्हणजे एका गृहिणीची धावपळ सुरू झाली .
मुलांचे गणवेश स्वच्छ धुवून कडक इस्त्री करणे , बुटांना पाॕलीश करून ठेवणे , नवरोबाचे पांढरे शुभ्र शर्ट तयार ठेवणे, त्यांनाही विविध क्लब , बँक , शाळा ईत्यादी ठिकाणी झेंडा वंदन साठी जायचे असते . तसे माझेही विविध महिला मंडळ, अनाथ आश्रम, कुष्ठधाम , ईत्यादी ठिकाणी झेंडा वंदन , सामाजिक ऊपक्रम अंतर्गत फळे,बिस्किटे,वह्या वाटप करणे , अशा कार्यक्रमामुळे माझीही तयारी करावी लागते . जसे, पांढरी सुती साडी तिरंगी बांगड्या , फुलांचा शुभ्र गजरा अशी खास तयारी. त्यासाठी मी ताज्या शुभ्र कुंदकळ्यांचा गजरा माळीत बसले , सकाळी उशीर होऊ नये म्हणुन एक दिवस आधीच कामे आटोपणे सुरू होते इतक्यात मोबाईल चाळत बसलेला धाकटा म्हणाला
"अग आई !पहा न हा फ्रीडम फायटर्सचा व्हिडिओ "
मुले सध्या शुद्ध मराठीत नव्हे तर मिग्लिश बोलतात , म्हणजे निम्मे शब्द इंग्रजी !
चिरंजीवास बोलतं करण्यासाठी मी म्हणाले,
" हं काय रे? तुच सांग बर ,मी जरा कामात आहे , तू सांग मी ऐकते हं ! "
"अग्ग आई ! या साऱ्या फ्रीडम फायटर्सनी कित्ती ग्रेट वर्क केले ग "
त्याचा आश्चर्यचकित चेहरा पाहून मला मुलं काही चांगलं पाहतोय याचा मनस्वी आनंद होत होता , पण त्याने बोलाव म्हणून म्हंटल ,
" हो रे ...बर मग तुझं यावर काय म्हणण आहे रे ? "
"आई, हे पाहून मला पण काही तरी करावं असं वाटतय ...पण मी काय बरं करू ?
"अग आई तु काय करतेस ग ? आपल्या कंट्री साठी .....आय मीन्... अग देशासाठी?"
"अरे मी ना ....अं..."
मी खरच काय करते ?
आणि आठवायला लागले . मी कुटुंबाची केवळ झेंडा वंदनचीच तयारी करते . पण देशासाठी काय करते? रांगोळीत तिरंगा काढणे वा मुलांच्या गालावर तिरंगा रंगवणे , छोटे झेंडे करून देणे , झेंडावंदनला जाऊन येणे यापलीकडे काय करते ?
मला उत्तर सापडत नव्हते..
असे कसे आपण ?
विचारचक्र फिरायला लागलं , आतून आवाज आला.... पोटतिडकीने मन म्हणत होतं .
पण माझेही माझ्या देशावर खुप खुप प्रेम आहे .
कितीतरी लोकांनी बलीदान करून हे स्वातंत्र्य मिळवलं याची जाणिव मला आहे .
मन म्हणालं. " थातुर मातुर कपडे बिस्किटे वह्या वाटून फोटोत झळकणे ही देशसेवा आहे का ? किती खरी ? ज्यांनी स्वतःच्या प्राणाची , घरादाराची आहूती दिली,
त्यांच्यासमोर मला माझीच लाज वाटली .
मला हे सत्य ठाऊक होतं , की स्वातंत्र्याशिवाय आपणा सर्वांना पशूपेक्षाही वाईट दयनीय जीवन जगावे लागले असते . आज त्यांच्या बलिदानामुळे मी, आपण सारे स्वतंत्रपणे आनंदात ,सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगत आहोत . हे खरे ,पण.... ज्यांच्यामुळे हे लाभले त्यांची मनात कृतज्ञता ठेवणे किंवा देशावर खुप प्रेम आहे असं म्हणणे तसे कोरडेच नाही का ?
आता माझी चिमुकली पण विचारू लागली . आई मी पण देशासाठी काही तरी करणार . सांग काय करू ?
मी डोळे मिटले मनात त्या सर्वच महापुरूषांना ,वीर जवानांना,शहिदांना, वीरांगणांना वंदन केले. आणि रामसेतुतली खारूताई माझ्या डोळ्यापुढे आली . नवा ऊत्साह आला , दिशा मिळाली , मार्ग दिसला हुरूप आला.
जरी मी एक सामान्य गृहिणी असले तरी मी छोटेसे काही करू शकते . मी माणूस आहे . असहाय्य पशू तर नाही ना . बस ...सर्व सजीवात मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे. बुद्धी आहे
ती वापरू. निश्चय केला . मुलांना सांगितलं मी आणि आपण सारेच निश्चय करू की
देशात योग्य सरकार येण्या साठी प्रत्येक वेळी मतदान करणार .
कितीही घरात अडचण येवो , दुःखी घटना वा आनंद चे कार्य असो मतदान करणारच.
देशहित जपणाऱ्या , प्रामाणिक व्यक्तीस मत देणार , कुणी लाच दिली तरी देशाशी बेईमानी नाही , मत विकणार नाही , गद्दारी नाही देशहित महत्वाचे . कारण अयोग्य व्यक्तीला निवडून दिले तर देशाची प्रगती नाही , नागरीक सुरक्षित राहणार नाही , गुंडगिरी वाढेल म्हणुन देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित.
आणि दुसरा निश्चय हा की देशाची नैसर्गिक संपत्ती जसे वीज ,पाणी , पेट्रोल इत्यादी इंधने जपुन वापरणार.
अशी मी प्रतीज्ञा घेत आहे !
कुठल्याही प्रसिद्धी , पेपर , फोटो , नेम फेम साठी नाही तर माझ्या स्वतः साठी आत्मसन्मानासाठी !!
मुलीने चटकन लाईट बंद केला , खिडकी ऊघडली आणि प्रकाशासोबत आनंदाचे वारे घरात . मनात आले
उड्या मारत मुलीने जाहीर केले ,
"आई, मी शाॕवरपेक्षा बादली घेईन , अर्धा पेला पाणी घेईन, खोलीतले दिवे बाहेर जाताना बंद करेन "
चिमुकलीचे बोलणे ऐकून खुप आनंद झाला.
पुढे ऊत्साहाने मुलांना सांगितलं ,
की पहा , आपण हे पण करू शकतो बरं ,
" काय ग ? "
दोघांनी कान टवकारले.
सांगते हं.
आपण स्वतःशक्य तेवढे भारतीय वस्तुंचा वापर करायचा. प्लास्टिकचा कमीतकमी वापर , परदेशात वागतो तसे इथेही नियम पाळून . जसे, तिथे सार्वजनिक स्वच्छता पाळतो तसेच आपल्या आजुबाजूला, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे , सुका ओला कचरा वेगळा ठेवणे , ओला कचऱ्याचे खत करणे.
ही लिस्ट आता वाढतच जाणार होती.
मुलगी म्हणाली
"दो रूपये भी बहोत बडी चीज है बाबू"
मी म्हटलं
" छोटीसी देशसेवा भी बडा आनंद देती है बेटा "
मन आनंदाने देशाभिमानाने भरून आलं.
जय हिंद !
वन्दे मातरम !!
..........लेखिका............
..........सुचिता पेंसलवार........
आमच्या blog वरील सर्व कथा खालील फेसबुक पेजवर मिळतील.
आमच्या फेसबुक पेजची link
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
खुप छान लिहिले.
ReplyDeleteखरे आहे आपलेही काही योगदान असावे.
सुंदर लिहिले ग ....खरेच लहान मुलांच्या मनात ही भावना बिंबवली पाहिजे ...तू छान शब्दांत मांडले ....jyoti
ReplyDeleteअप्रतिम लेखन🌹 सुंदर लिहिले आहेस 🌹
ReplyDeleteवाहवा
ReplyDelete